
भरहूत स्तुपावर हा बुध्द चरित्रातील प्रसंग शिल्पामध्ये कोरलेला आहे …
सुदत्त नावाचा व्यापाऱ्यांचा प्रमुख असतो ..तो तत्कालीन राजांपेक्षा धनवान असतो ..तो गोर गरीबांना मोपत अन्नदान करीत असल्यामुळे तो ” अनाथपिंडक ” ह्या नावाने सुप्रसिध्द असतो ..त्याला एकदा जेत राजकूमाराचे वेळूवन आवडते .हे वेळूवन तथागत बुध्दांना दान म्हणून द्यावे ही कल्पना त्याचा मनात येते ..वेळूवन विकत द्यावे हा प्रस्ताव जेत राजकुमारासमोर ठेवतो ..पण हा प्रस्ताव फेटाळण्यात आला .अनाथपिंडक त्यानंतर नाराज न होता अधिकच आग्रही झाला ..सततच्या आग्रहाला कंटाळून जेत राजकुमार रागाने उद्गारला ..” वेळुवन सोन्याच्या मोहरांनी झांकून टाक ..जेव्हढी जमिन सोन्याच्या मोहऱ्यांनी झांकशील तेव्हढी वेळुवनाची जमिन तुझी होईल ” ..
अशी मागणी आपली पुर्ण होणारच नाही .असे जेत राजकुमाराला वाटत होते ..
पण बघतो ते काय ?
शेकडो बैलगाड्या वेळुवनात येत होत्या ..
हजारो नोकर सोन्याच्या मोहरा पसरवून वेळुवन झांकून टाकत होती ..दिवसभर हा क्रम चालू होता ..बैल व नौकर दमून गेलेत ..हे दृष्य पाहून जेत राजकुमार अवाक् होऊन बघत आहे ..एका नोकराने शेवटी जल शिंपण्यासाठी पाण्याचा कलश ( झारी ) आणलेली आहे. हातावर उदक ( जल) सोडल्या शिवाय दान पुर्ण होत नसते ..हा समज तत्कालीन समाजाचा होता ..ही प्रथा तत्कालीन बौध्द उपासक – उपासिकांची होती ..हे शिल्प त्याचा पुरावा आहे ..
हे शिल्प कोलकाता वस्तुसंग्राहलयात आजही पाहायला मिळते .